शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ म्हणतात...मी भाजपवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:29 IST

सांगली : विधानपरिषदेसाठी मी भाजपचाच एबी फॉर्म दाखल केला होता. भाजपचा मी क्रियाशील सभासदही आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे प्रवेश करण्याची मला गरज वाटत नाही, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. रयत क्रांती हा पक्ष नसून शेतकऱ्यांसाठीचे ते व्यासपीठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी ...

सांगली : विधानपरिषदेसाठी मी भाजपचाच एबी फॉर्म दाखल केला होता. भाजपचा मी क्रियाशील सभासदही आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे प्रवेश करण्याची मला गरज वाटत नाही, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. रयत क्रांती हा पक्ष नसून शेतकऱ्यांसाठीचे ते व्यासपीठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश केला असून, भाजपचा क्रियाशील सभासद आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्टÑवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा चष्माच हिरवा असल्याने त्यांना सर्व हिरवेच दिसते आहे. आम्ही आजवर कोणती बॅँक लुटली नाही, एकाच जागेवर दोन-दोन संस्था उभारून अनुदान लाटले नसल्याने आरोपांची फिकीर नाही. मोठं बोल, खोटं बोल अन् तेही रेटून बोल ही धनंजय मुंडे यांची वृत्ती आहे.खोत म्हणाले की, कृषी अनुदानाचा नातेवाईकांनाच लाभ देण्यात आल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. यावर सभागृहातच मी सविस्तर उत्तर दिले. तरीही ते माझ्यावर आरोप करत आहेत. मोठे बोल, खोटे बोल अन् तेही रेटून बोल ही मुंडे यांची वृत्ती आहे. मुंडेंनी अगोदर आपल्या भोवतीचा जाळ बघावा. आम्ही कोणतीही बॅँक लुटली नाही. दारूगोळा भरून आम्हीही तयार आहोत. आम्ही आजवर एका जागेवर दोन-दोन सूतगिरण्या दाखवून कोणतेही अनुदान लाटले नाही. गोरगरीब जनतेच्या नावाने मागासवर्गीय सूतगिरण्या उभारून त्या लुटल्या नाहीत. त्यामुळे ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हाजको’ ही राष्टÑवादीची प्रवृत्ती आहे.दिलीपतात्या जयंतरावांच्या गटातील सोंगाड्या!इस्लामपूरच्या सभेत मला काहींनी फुटाणा, तर काहींनी दीडआणा म्हटले, पण आम्ही केव्हा तरी प्रवासातच फुटाणे खात असतो. मात्र, जे रात्रीचे फुटाणेच घेतात, त्यांना फुटाणेच आठवणार. फुटाणे खाल्ल्यानंतर त्यांना आपण राजा बनल्याचा भास होतो. जे स्वत:च काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसºयावर आरोप करताना थोडा विचार करावा. फुटाण्याचा आरोप करणारा नेता जयंतरावांच्या गटाचा सोंगाड्या आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी दिलीपतात्या पाटील यांचे नाव न घेता लगावला.माणसे आली की आणली?इस्लामपूर येथे झालेल्या हल्लाबोल यात्रेवर बोलताना खोत म्हणाले की, टीका करून त्यांना प्रसिध्दी मिळत असेल म्हणून ते माझ्यावरच बोलणार. पक्षवाढीसाठी त्यांची धडपड सुरू असून, मेळाव्यासाठी लोक आले होते का आणले होते, याची माहिती अद्याप घेतली नाही. शक्तिप्रदर्शनाचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.